जम्मू काश्मीरमध्ये वंदे भारत ट्रेन धावण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. शनिवारी २५ जानेवारीला भारतीय रेल्वेने ही यशस्वी चाचणी घेतली आहे. सकाळी ८ वाजता कटरा स्टेशनहून वंदे भारत ट्रेन रवाना झाली ती अवघ्या ३ तासांत श्रीनगरला पोहचली. यावेळी रेल्वे स्टेशन परिसर भारत माता की जय या घोषणेनं दुमदुमला. १६० किमी प्रति वेगाने आरामदायक आणि वेगवान प्रवास पूर्ण केला. जम्मू काश्मीरमधील थंड वातावरण पाहता विशेष काळजी घेण्यात आली होती.