मुंबई – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे. तसेच चालकांची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची चाचणी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस होणे गरजेचे आहे. तसेच शाळांनी अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच खाजगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये केली आहे. चालकांची पार्श्वभूमी, ज्यामध्ये बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघातांची प्रकरणे समाविष्ट आहेत. खासगी वाहतूक वापरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशीलांची माहिती दिली पाहिजे. याव्यतिरिक्त, पालकांनी सुरक्षिततेच्या उद्देशाने चालकांची वैयक्तिक माहिती राखली पाहिजे, बसेसना जीपीएस बसवणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, बसची तांत्रिक तपासणी दर सहा महिन्यांनी करून आरटीओ कडून प्रमाणपत्र घेणे, अशा विविध उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
